Homeमहाराष्ट्रधनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची...

धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची धमकी, नेमके काय घडले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. समाधान खिंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना तिथे धनंजय देशमुख देखील आले होते. त्याचवेळी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाजवळील पिस्तूल काढून घेत समाधान खिंडकर यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. धनंजय देशमुखांवर गुन्हा दाखल या धक्कादायक प्रकारामुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर समाधान खिंडकर यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्यावर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान खिंडकर जेवणासाठी बसले असताना धनंजय देशमुख यांनी अचानक संताप व्यक्त करत, अंगरक्षकाकडील पिस्तूल हातात घेऊन त्यांना थेट धमकी दिल्याचे म्हटले आहे. या गंभीर घटनेनंतर खिंडकर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. धनंजय देशमुख यांच्यावर झालेल्या या नव्या आणि गंभीर आरोपांमुळे, आधीच राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, या प्रकरणात आता आणखी एका गुन्ह्याची भर पडल्याने राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातही चर्चांना मोठे उधाण आले आहे. मुख्य साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादा खिंडकर यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, दादा खिंडकर हे त्यांच्या घरी असताना त्यांचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर तिथे आला. त्यांच्यात जुन्या वादावरून चर्चा सुरू असताना, समाधानने संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नये आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी धनंजय देशमुख यांना सांगावे, असा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादा खिंडकर यांनी या मागणीला स्पष्ट विरोध केला असता, समाधान खिंडकर याने त्यांना शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुख्य हत्या प्रकरणातील साक्षीदारावरच दबाव टाकून त्याला अशा प्रकारे धमकावल्याच्या या नव्या घटनेमुळे, आता या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!