पावन अधिकमासानिमित्त संत सद्गुरू श्रीविठोबादादा महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 28 मे ते 3 जून 2026 या कालावधीत एन-8, सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ असलेल्या ‘सप्तपदी मंगल कार्यालय, अयोध्या नगर, येथे पार पडणार आहे. समस्त सद्गुरू श्रीचातुर्मास्यमहाराज गुरुभक्त परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत सद्गुरू विठोबादादा महाराज चातुर्मास्ये हे संत भानुदास महाराजांचे अवतार मानले जातात. संतकवी दासगणू महाराज यांनीही आपल्या रचनेत “तु पूर्वजन्मामाझारी भानुदास होतास” असे लिहून याला दुजोरा दिला आहे. सतराशेच्या शतकात जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र अन्वा (ता. भोकरदन) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्याच वढोद गावी श्री मुरलीधर कुलकर्णी यांच्याकडे झाले, जिथे त्यांनी संस्कृत, व्यवहारलेखन, श्रीमद्भागवत आणि गीतेचे सखोल अध्ययन केले. ‘चातुर्मास्ये’ पदवी आणि पांडुरंगाचा चमत्कार संत विठोबादादा महाराजांनी सलग 12 वर्षे पंढरीची वारी केल्यानंतर खुद्द श्रीविठ्ठलाने त्यांना सहकुटुंब ‘चातुर्मास्य’ वारी करण्याची व कीर्तनसेवा करण्याची आज्ञा दिली. पंढरपूर येथील त्यांच्या कीर्तनाला भाविकांची अलोट गर्दी होत असे. त्यांच्या भक्तीची ख्याती सांगणारी एक अद्भूत कथा इतिहासात जोडलेली आहे. एका वारीच्या वेळी एका वृद्ध आजीने गर्दीमुळे दर्शन न मिळाल्याने देवाच्या चरणी एक नारळ अर्पण केला होता. तो नारळ मंदिरातील पुजाऱ्यांनाही काढता येत नव्हता. शेवटी पुजाऱ्यांना दृष्टांत झाला की, हा नारळ माझ्या लाडक्या विठोबा दादा चातुर्मास्ये यांचा आहे. जेव्हा विठोबादादांनी मंदिरात येऊन देवापुढे पदर पसरला, तेव्हा तो नारळ चटकन त्यांच्या पदरात पडला. या चमत्कारानंतर संपूर्ण पंढरपुरात सद्गुरु विठोबा दादामहाराज की जय, असा जयघोष झाला आणि त्यांना ‘चातुर्मास्ये’ हे नाव मिळाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आर्याकार मोरोपंतांशी स्नेह सद्गुरु दादा महाराजांनी मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात भागवत धर्माचा मोठा प्रचार-प्रसार केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांना आदराने महेश्वर नगरीत नेले होते, तर आर्याकार महाराष्ट्रकवि मोरोपंत हे आपले कोणतेही काव्य सद्गुरु विठोबादादांना दाखवल्याशिवाय प्रकाशित करत नसत, इतका त्यांचा घनिष्ठ स्नेह होता. 36 वर्षे चातुर्मास सेवा केल्यानंतर त्यांनी श्रावण वद्य त्रयोदशीला पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर समाधी घेतली. संतश्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये संस्थान श्रीक्षेत्र अन्वा व पंढरपूर चे पंधरावे पीठाधिश प.पू.सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये कथा निरूपण करणार आहेत. असा असेल दैनंदिन कार्यक्रम कलावंतांची संगीत साथ या चरित्र कथेला संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंतांची साथ लाभणार आहे. यामध्ये पखवाज वादक म्हणून ह.भ.प.श्री.रोहित तरंगे चाकाटीकर, हारमोनियम वादक म्हणून ह.भ.प.श्री. पोपट दसुरकर आणि गायक म्हणून ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर माऊली तायडे लोहारखेडा हे सेवा रुजू करणार आहेत. 3 जून रोजी महाप्रसादाने सांगता या चरित्र कथेचा प्रारंभ 28 मे 2026 (गुरुवार, अ. ज्येष्ठ शु. 12) रोजी होणार असून, सांगता 3 जून 2026 (बुधवार, अ. ज्येष्ठ व. 3) रोजी संध्याकाळी भव्य महाप्रसादाच्या वाटपाने होणार आहे.
Source link
संत विठोबादादांच्या चरित्र कथेचा संभाजीनगरात भव्य सोहळा:28 मेपासून प्रारंभ- 3 जूनला सांगता; अधिकमासानिमित्त धार्मिक पर्वणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























