सत्ताधारी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्री केले. मला केवळ राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागेल, असे ते अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर फसवणुकीचा आरोप करताना म्हणालेत. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या तिकिटावर विधान परिषदेवर जाणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. बच्चू कडूला घरी बोलावन मंत्री केले ही माझी चूक झाली. तो जुना शिवसैनिकच होता. पण लोभापायी गेला त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात मला राज्यमंत्रीपद दिले. माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले. एकनाथ शिंदेंनीच माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून दिली होती. मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आमच्या मतांमुळेच ते मुख्यमंत्री झाले. त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आ्हाला संख्याबळासाठी गळ घातली होती. ठाकरेंनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले नाही. त्यांनी माझ्याऐवजी गडाखांना ते दिले. उद्धव ठाकरे माझ्याविषयी जे काही बोलले ते मनापासून बोलले असे वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले. मग आम्ही चूक केली असे म्हणणार का? मी गुवाहाटीला जातानाही उद्धव ठाकरे यांना विचारले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना फुटीचे खापर माझ्या डोक्यावर फोडू नये, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू शिंदे गटाकडून विधान परिषदेवर उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते. त्यानंतरही त्यांची ठाकरे मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. पण एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी त्यांना साथ दिली होती. ते महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेलात गेले होते. यामुळे उद्धव यांना जबर धक्का बसला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करून विधान परिषदेची आमदारकी मिळवली.
Source link
शिवसेना फुटल्याचे खापर माझ्यावर फोडू नका:बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; कॅबिनेट मंत्रीपदावर फसवणूक केल्याचा आरोप
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























