शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधारी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची त्यांनी अक्षरशः खिल्ली उडवली. लोकांच्या कामांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांन भेटावेच लागते. त्यामुळे या भेटीचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यामुळे त्याचे नाव बदलून स्लो ऑपरेशन ठेवा. जे लोक ऑपरेशन टायगर म्हणतात, त्यांनाच हे कधी संपणार ते विचारा, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीला नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. गत काही दिवसांपासून आष्टीकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी पक्षाच्या अनेक बैठकांना दांडी मारल्यामुळे यासंबंधीच्या चर्चेला बळही मिळाले. त्यामुळे आजच्या त्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आष्टीकरांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. तसेच एकनाथ शिंदेंची भेट ही लोकांच्या कामासाठीच घेतल्याचेही स्पष्ट केले. आष्टीकर म्हणाले, सध्या आमच्या पक्षाच्या विभागवार बैठका सुरू आहेत. आज आमच्या मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिवा व जालना येथील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षीय संख्याबळ व महाविकास आघाडीशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे संख्याबळ कसे राहील व निवडणूक कशी जिंकता येईल यावरही बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याचा निर्णय नेते मंडळी घेतील. एकनाथ शिंदेंची कामासाठीच भेट घेतली आष्टीकरांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी आज त्यांना याविषयी छेडले असता आष्टीकर म्हणाले, मला प्रसारमाध्यमेच चर्चेत आणत आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की, विनाकारण ‘ध’ चा ‘मा’ करू नका. असा कोणताही प्रकार आमच्या कोणत्याही खासदाराच्या मनात नाही. कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांकडे जावेच लागते. त्याच हिशोबाने आमचे जाणे असते. जावेच लागते. पण कोणत्याही बाबतीत अजून किंतू परंतू नाही. पण माध्यमांकडून याविषयी उगीचच गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे असे करू नका अशी माझी विनंती आहे. मी विकासनिधीसाठी शिंदेंची भेट घेतली होती. मी त्याचे पत्रही सादर केले होते. मी एकट्याने जाऊन काहीही होणार नाही. हे सर्वांना माहिती आहे. पण त्यानंतरही उगीचच मला चर्चेत आणता व महाराष्ट्रात सगळीकडे फिरवता. मी त्या दिवशी सह्याद्रीवर अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मी गेलो तेव्हा ते निघत होते. ते कुठे जात आहेत याची मी माहिती घेतली. त्यावर ते त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्याचे समजले. त्यानुसार मी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना पत्र दिले. हा एवढाच विषय आहे. भेटीची उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती का? पत्रकारांनी यावेळी आष्टीकरांना शिंदेंसोबतच्या भेटीची कल्पना तुम्ही उद्धव ठाकरे यांना दिली होती का? असा प्रश्न केला. त्यावर आष्टीकर म्हणाले, पक्षप्रमुख किंवा इतर कुणी मला कधीही सांगितले नाही. दैनंदिन जीवनात लोकांच्या अडीअडचणी असतात. त्यांच्यासाठी जावे लागते. प्रत्येकवेळी जाताना त्यांना सांगणे किंवा विचारणे होत नसते. ज्या – त्या वेळचा प्रश्न असतो. जिथल्या तिथे कामे असतात, ते घेऊन जावे लागते. पण तुम्ही जसे म्हणता, तसे माझ्या पक्षप्रमुखांनी मला कधीच विचारले नाही. त्यावर आक्षेपही घेतला नाही. दिल्लीतील स्नेहभोजनावर काय म्हणाले? पत्रकारांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला आष्टीकरांनी लावलेल्या हजेरीविषयीही प्रश्न केला. त्यालाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, असे वारंवार कधीच घडले नाही. ज्या खासदारांना तिथे असताना वेळ असेल किंवा बोलावले असेल तर तिथे जाण्यात काहीही गैर नाही. एखादावेळी जेवायला गेले किंवा भेटायला गेले तर तेच बोलणे होईल असे कुठे असते का? दिल्लीसारख्या ठिकाणी महाराष्ट्राचा माणूस कुणी कुणाला भेटत नाही किंवा कुणाची भेट होत नाही. एवढा मोठा दिवस असतो. एक मिटिंग संपली की, पुन्हा काही का नसते. त्यामुळे एवढा मोठा दिवस आपल्या माणसासोबत घालायचा असेल किंवा कुणीतरी बोलवत असेल तर त्यात काहीही गैर नाही. मी सुद्धा जेवण दिले होते. त्यालाही अनेक पक्षांचे खासदार आले होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला एक माणुसकीच्या नात्याने पाहिले पाहिजे. एकच गोष्ट नसते. ऑपरेशन टायगरला स्लो ऑपरेशन नाव ठेवा नागेश पाटलांनी यावेळी कथित ऑपरेशन टायगरची खिल्लीही उडवली. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना 7 खासदार भेटले किंवा त्याहून अधिक भेटले. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे लोकांची कामे घेऊनी जावेच लागेल. सर्वांनाच भेटावे लागेल. पण त्याचा अर्थ असाच काढायचा हे चुकीचे आहे. ऑपरेशन टायगर असे यासंबंधी म्हटले जाते. पण टायगर हा आपल्या देशाचा एक मोठा अभिमानाचा प्राणी आहे. त्याला एवढे मोठे नाव देऊन तुम्ही मागील 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगर म्हणता. जे लोक ऑपरेशन टायगर म्हणतात, त्यांनाच विचारा की हे कधी संपणार आहे. आम्ही निवडून आल्यापासून दुसऱ्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. आता हे बंद करा. त्याचे नाव बदलून स्लो ऑपरेशन असे ठेवा. सत्ताधारी पक्षात केव्हा जाणार? पत्रकारांनी यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात केव्हा जाणार? असा थेट प्रश्न केला. त्यावर आष्टीकर म्हणाले, तुम्ही मला कधी जाणार हा प्रश्न केला. जाण्याचा विषय आमच्या मनातही नाही. पण तुम्ही जुलमेच पाठवत असाल तर ज्या दिवशी जायचे असेल त्या दिवशी तुम्हाला बोलवून घेतो व सांगतो. पण आज उद्धव ठाकरेंशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी शिंदेंसोबतच्या भेटीविषयी एकही शब्द आम्हाला विचारला नाही. या प्रकरणी काही सांगण्यासारखे असते तर मी नक्कीच उद्धव यांना सांगितले असते. मी त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवली नाही. आजही तुम्ही चर्चा करता म्हणून चर्चा होत आहे. पण आमच्या बैठकीत यावर एक शब्दही कुणी विचारला नाही.
Source link
नागेश पाटलांनी ‘ऑपरेशन टायगर’ची उडवली खिल्ली:’स्लो ऑपरेशन’ असे नाव ठेवण्याचा टोला; उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























