गोरगरीब आणि हक्काचे छप्पर नसलेल्या गरजूंना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत. मात्र कन्नड तालुक्यात या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध योजनांमधील तब्बल १६ हजार ९७ घरे अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. निधीची टंचाई, वाळूचा तुटवडा, प्रशासकीय समन्वयाचा अभाव यांमुळे ही घरे रखडली आहेत. लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहिल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कन्नड तालुक्यात एकूण १४२ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने बेघरांना हक्काचा आसरा देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते. या सर्व योजनांतर्गत तालुक्यात २८ हजार ९६८ घरांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे यातील तब्बल १६ हजार ९७ घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. हप्ता मिळाल्यास लाभार्थ्यांना बांधकाम करणे सोयीचे ठरेल. मात्र प्रशासनाकडून वेळेवर हप्ता दिला जात नसल्याचा आरोप लाभार्थींकडून होत आहे. प्रधानमंत्री आवास ः २३,०१५ मंजुरी, १६ हजार ९३ अपूर्ण. रमाई आवास ः ३,९९३ मंजुरी, १ हजार ५०९ घरे अुपूर्ण. शबरी आवास ः १,२३८ मंजुरी, ५११ कामे अपूर्ण आहे. यशवंत आवास ः ४६४ पैकी ४६४ कामे रखडलेली आहेत. अटल बांधकाम योजना ः १३ घरे मंजूर असताना सध्या ६ घरे अपूर्ण स्थिती आहेत. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांना वाळूच मिळालेली नाही. त्यामुळे तहसीलदार सारिका भगत यांना घरकुल लाभार्थ्यांची व त्यांच्या गावांची यादी सादर करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने आरक्षित केलेल्या नदी घाटातून वाळू लवकरच मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास योजना, शबरी आवास, यशवंत आवास, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत तालुक्यात २८ हजार ९६८ घरांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे यातील तब्बल १६ हजार ९७ घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. Ã लाभार्थींना तुकड्या-तुकड्यांमध्ये पैसे दिले जातात. घरकुल झाल्यावर सौर ऊर्जेसाठी ५० हजार, रोहयोतून २८ हजार, शौचालयासाठी १२ हजार असे विभागून पैसे मिळतात. लाभार्थ्यांना थेट अडीच लाख रुपयांचे अनुदान एकाच टप्प्यात दिले तर योजना वेगाने पूर्ण होईल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. – डॉ. तृप्ती राजपूत, जि. प. सदस्य. विजकुमार पंडित, सहायक गटविकास अधिकारी, कन्नड Q. तालुक्यात किती प्रमाणात घरकुले अपूर्ण आहेत, कारणे काय? A. काही लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला. मात्र काम केले नाही. काहींना जागा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. Q. प्रशासकीय अडथळे आहेत का? A. अडीच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. निधी मिळताच लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. Q. वाळू मोफत देण्याच्या घोषणेचे काय झाले, कार्यवाही सुरू आहे का? A. कन्नड तहसीलकडे यादी दिली आहे. लवकरच वाळू उपलब्ध होणार आहे. Q. लाभार्थ्यांसाठी जागेचा प्रश्न कधी मिटणार, प्रशासनाचे नियोजन कसे ? A. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. निर्णय होईल. Q. घरकुलासाठी लाभार्थ्यांना किती निधी मिळतो, किती टप्प्यात येतो? A. एकूण १ लाख २० हजार रुपयांचा निधी मिळतो. टप्प्याटप्प्याने वितरण होते. प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते.
Source link
कन्नडमध्ये 16 हजार घरकुले अपूर्ण:142 गावांतील लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित, पंचायत समितीचे दुर्लक्ष
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























