पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ख्रिस्ती धर्मीय असूनही त्यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी पुणे येथील जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोहित राजेश पाटील हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दौंड नगरपरिषदेवर ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज (क्र. EL-2025-00182959) दाखल केला आहे. मात्र, मृणाल ढोलेपाटील, रतन जाधव, सचिन कुलथे आणि ॲड. सुशांत वाघमारे या तक्रारदारांनी त्यांच्या अर्जातील माहितीवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. तक्रारीनुसार, उमेदवाराने स्वतःचा आणि आपल्या भावंडांचा शाळा सोडल्याचा दाखला जाणीवपूर्वक समितीसमोर सादर केलेला नाही. पाटील यांच्या १२ वीच्या प्रमाणपत्रावर त्यांची जात ‘हिंदू मराठा’ अशी नोंदवलेली आहे. विशेष म्हणजे, अर्जात त्यांनी आपले शिक्षण दौंड येथील सेठ जोतीप्रसाद विद्यालयात झाल्याचे म्हटले असले तरी, १२ वीच्या प्रमाणपत्रावर पुण्याच्या ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’चा उल्लेख आहे. त्यांची पूर्वीची शाळा ‘सेबॅस्टियन हायस्कूल’ असल्याचेही समोर आले आहे. रोहित पाटील यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘ख्रिस्ती’ असा धर्माचा स्पष्ट उल्लेख आहे. कुटुंबातील अनेक सदस्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून, उमेदवाराच्या आजोबांचे अंत्यसंस्कारही ख्रिस्ती दफनभूमीत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वंशावळीत देखील अनेक ख्रिस्ती नातेवाईकांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रोहित पाटील यांनी ज्या दिवशी (१२ नोव्हेंबर २०२५) अर्ज केला, त्याच दिवशी त्यांना जात प्रमाणपत्र काही तासात जारी करण्यात आले. कोणत्याही सखोल चौकशीशिवाय एकाच दिवसात दाखला कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित करत यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, धर्मांतर करून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी कठोर निकष पूर्ण करावे लागतात, जे या प्रकरणात पाळले गेले नसल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संशयास्पद प्रमाणपत्र रद्द करावे आणि खोटे पुरावे सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसींच्या हक्कावर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Source link
दौंड नगरसेवकाच्या जात प्रमाणपत्रावरून वाद, ख्रिस्ती असल्याचा आरोप:ओबीसी नेत्यांनी तक्रार केली; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























