HomeमनोरंजनWhat will happen if team india skips travelling to sri lanka for...

What will happen if team india skips travelling to sri lanka for playing ind vs pak match 2026 | जर IND vs PAK सामना रद्द झाला तर टीम इंडियाला पूर्ण दोन गुण मिळणार? जाणून घ्या नियम


IND vs PAK: T20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात जास्त चर्चेत असलेला सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत. मात्र हा हाय-वोल्टेज सामना होणार की नाही, याबाबत सध्या मोठी अनिश्चितता आहे. पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास हा सामना अधिकृतपणे रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला पूर्ण 2 गुण मिळतील का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारताला 2 गुण मिळण्यासाठी काय करावे लागेल?

ICC च्या नियमांनुसार, जर एखादा संघ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही, तर त्या संघाला पराभूत घोषित केले जाते. मात्र भारताला या सामन्यातून पूर्ण 2 गुण मिळवायचे असतील, तर काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वेळेत कोलंबोला पोहोचावे लागेल आणि ठरलेल्या वेळेला मैदानावर उपस्थित राहावे लागेल. टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार मैदानात हजर असणे अनिवार्य आहे. जर पाकिस्तानचा कर्णधार टॉससाठी उपस्थित राहिला नाही, तर सामना अधिकाऱ्यांकडून भारताला विजेता घोषित केले जाईल आणि भारताच्या खात्यात थेट 2 गुण जमा होतील.

भारत कोलंबोला गेला नाही तर काय?

जर भारतीय संघाला आधीच माहिती असताना की सामना होणार नाही, तरीही भारताने श्रीलंकेचा दौरा टाळला, तर परिस्थिती बदलू शकते. अशावेळी सामना अधिकाऱ्यांकडून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण 2 गुण मिळवण्यासाठी भारताचा कोलंबोला जाणे आणि मैदानावर हजर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच कारणामुळे भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाणार असल्याचे समजते. संघ सराव सत्रात सहभागी होईल आणि सामन्यापूर्वी माध्यमांशी संवादही साधेल.

ICC पाकिस्तानवर कारवाई करणार?

या प्रकरणात ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ICC च्या मते, असा बहिष्कार खेळाच्या आत्म्याच्या विरोधात आहे. सध्या कोणतीही अधिकृत शिक्षा जाहीर करण्यात आलेली नसली, तरी पाकिस्तानला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.

नेट रनरेटवरही होणार परिणाम

भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा फटका ठरू शकतो. सामना गमावल्यास पाकिस्तानचा नेट रनरेट मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम पुढील टप्प्यातील पात्रतेवर होऊ शकतो.

आता सर्वांचे लक्ष ICC आणि PCB कडे लागले आहे. पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहतो की शेवटच्या क्षणी माघार घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!