युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा : भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा या दोघांनी २०२५ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र आता घटस्फोटाच्या जवळपास 11 महिन्यांनी दोघे एकत्र एका रिअॅलिटी शोमध्ये दिसू शकतात. मार्च महिन्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती, मात्र आता हे दोघे ‘द 50’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसू शकतात अशी चर्चा आहे.
सलमान खान ने त्याच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो दरम्यान ‘द 50’ या शोबाबत बोलला होता. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्सनालिटी येतील. जर रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा हे दोघे या शो मध्ये एकमेकांसमोर आल्यास ड्रामा पाहायला मिळू शकतो. ‘द 50’ हा शो भारतात 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.
2025 मध्ये चहल आणि धनश्रीचा घटस्फोट :
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांची लॉकडाउनमध्ये ओळख झाली होती. 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं, धनश्री चहल ही लॉकडाउनमध्ये चहलला डान्स शिकवायची. इथूनच दोघांचे सूर जुळले. धनश्री वर्मा अनेकदा स्टेडियममध्ये युजवेंद्र चहलला चिअर करताना दिसून यायची. मात्र अशातच 2024 मध्ये दोघांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आणि त्याच्या काही दिवसातच दोघांचा घटस्फोट झाला.
आरजे महवशला डेट करतोय चहल?
धनश्री वर्मा सोबत विभक्त झाल्यावर क्रिकेटर युजवेंद्र चहल हा आरजे महवश हिला डेट करतोय अशी चर्चा आहे. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलंय. आरजे महवश ही स्टेडियममध्ये चहलला सामन्यादरम्यान चिअर करताना दिसली. दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं, त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा : 6 वर्ष डेट करून बहिणीशी केलं लग्न, स्टार क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी माहितीये का?
चहलने धनश्रीला दिली चार कोटींची पोटगी:
क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा यांचा फेब्रुवारी 2025 रोजी घटस्फोट झाला. दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं लग्न केवळ 18 महिने चाललं आणि त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नव्हतं त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहत होते अशी माहिती कोर्टात सादर करण्यात आली. अखेर मुंबई कौटुंबिक न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला आणि दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटानंतर दोघे वेगळे का झाले याची अनेक कारण समोर आली. घटस्फोटानंतर चहलने धनश्रीला पोटगीत ४ कोटी रुपये दिले.
घटस्फोटाचं कारण काय होतं?
धनश्री वर्मा ही घटस्फोटानंतर एका रिअॅलिटी शो मध्ये गेली होती. यात तिने एका स्पर्धकाशी बोलताना सांगितलं होतं की, लग्नाच्या काही महिन्यांनी तिने युजवेंद्रला तिच्या सोबत चिट करताना पकडलं होतं. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं की धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिला असं वाटत होतं की चहलने त्याच्या हरियाणातील कुटुंबाला सोडून तिच्या सोबत मुंबईत शिफ्ट व्हावं. या दोघांवरून दोघांचं भांडण झालं आणि मग ते प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.






























