Homeपुणे / पिंपरी-चिंचवडप्रखर आंतर-शालेय बुद्धिबळ अंतिम सामन्यात दीर्घकालीन चॅम्पियन सबोधचा सामना नवीन स्पर्धक चिन्मयचा...

प्रखर आंतर-शालेय बुद्धिबळ अंतिम सामन्यात दीर्घकालीन चॅम्पियन सबोधचा सामना नवीन स्पर्धक चिन्मयचा आहे. Raurnmatrear विजय


आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. सुबोध आणि चिन्मय हे दोघे एकाच शाळेतील, एकाच वर्गातील विद्यार्थी आमने-सामने आले होते. ही स्पर्धा गेली तीन वर्षं सलग जिंकण्याचा विक्रम सुबोधपाशी होता, तर चिन्मय वडिलांची बदली झाल्यामुळे या शाळेत नवीनच आलेला. दोघेही खेळाडू तुल्यबळ, त्यामुळे सामना अटीतटीचा होता. खेळ बघायला शिक्षकांसह मुलांची ही गर्दी जमलेली! इतक्यात, बहुधा दडपणामुळे असेल, सुबोधची एक चाल चुकली आणि चिन्मयनं त्याचा फायदा उठवत डाव जिंकला. सुबोधचा चेहरा पडला. चिन्मयचं कसंबसं अभिनंदन करून, कोणाशीही न बोलता तो तिथून तडक बाहेर पडला. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आत्तापर्यंत केवळ बुद्धिबळातच नव्हे तर अन्य खेळांत आणि अभ्यासातही त्याचा हात धरणारं वर्गात कोणीही नव्हतं. पण या वर्षापासून म्हणजे नववीत आल्यापासून चित्र थोडं बदललं होतं.

याचं कारण तोच होता- चिन्मय… शाळेत नव्यानेच आलेला चिन्मय खेळणे, पोहणे, अभ्यास अशा सर्वच गोष्टींत वरचढ होता. परिणामी सुबोधच्या अनभिषिक्त साम्राज्याला बसलेला हादरा सहन करणं त्याच्या आवाक्या बाहेर गेलं होतं आणि आज तर त्याच्या दुय्यमतेवर ठळक शिक्का बसला होता.
घरी आल्यावर त्याचा उतरलेला चेहरा पाहून आईनं काय झालं ते ओळखलं. ती म्हणाली, ‘‘बाळा खेळात हार- जीत व्हायचीच. त्याशिवाय प्रगती कशी होणार? आता तू दुप्पट सराव कर आणि पुढील वर्षी आत्मविश्वासाने सामोरा जा.’’

‘‘त्याचा काही उपयोग नाही. त्याचे वडील कलेक्टर आहेत ना, म्हणून सगळ्यांनी त्याला डोक्यावर चढवून ठेवलंय. पण एक दिवस त्याला अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही.’’ सुबोधचा त्रागा बाहेर पडला.

‘‘अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही की घडवल्याशिवाय राहणार नाही ?’’ आई थोडं थांबून ती पुढे म्हणाली, ‘‘चिन्मय, आल्यापासून मी बघतेय तुम्ही मित्र त्याचा द्वेष करता, त्याला तुम्ही वर्गात एकटं पाडलंय. डबाही तो एकटाच खातो. मधल्या सुट्टीत कोणी त्याला खेळायला घेत नाही, शाळेत जाता-येतानाही त्याला कोणी सोबत करत नाही. खरं ना?’’

‘‘तुला हे सगळं कोणी सांगितलं ?’’

‘‘अरे तुझे मित्र घरी येतात तेव्हा तुमच्या गप्पांतूनच मी हे ऐकलं. पण म्हटलं, संधी मिळेल तेव्हा बोलू. राजा, मी जे सांगणार आहे ते शांतपणे ऐकशील ?’’
‘‘तू त्याचेच पोवाडे गाणार असशील…’’

‘‘हाच दृष्टिकोन ठेवून ऐकणार असशील तर मी गप्पच राहते.’’

‘‘बरं बरं सॉरी, सांग तर खरं!’’

आई त्याच्या जवळ जाऊन त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ‘‘बाळा, आमचे गुरू सांगतात की, जेव्हा आपण दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो, त्याच्याप्रती ईर्ष्या बाळगतो तेव्हा आपल्यातील गुण हळूहळू आपल्याला सोडून जाऊ लागतात. सद्गुण ही दैवी संपत्ती आहे. ती नकारात्मक शरीरात राहत नाही. या उलट तुम्ही एखाद्याच्या गुणांचा मनापासून आदर केलात, प्रशंसा केलीत तर ते गुण तुमच्यात संक्रमित होऊ लागतात. मी याचा अनुभव घेतलाय. तू प्रयत्न करून बघशील?’’

सुबोध विचारात पडला. त्याला आपल्या वागण्यातील चुका दिसू लागल्या. आईला मिठी मारत तो म्हणाला, ‘‘आई मी चुकलो, उद्यापासून तू सांगितल्याप्रमाणे वागण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.’’

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच सुबोध चिन्मयजवळ गेला, म्हणाला, ‘‘आजपासून मी तुझ्या शेजारी बसणार. डबाही आपण एकत्र खायचा. घरी जातानाही सोबत जायचं.’’

चिन्मयच नव्हे तर बाकीचे मित्रही त्याच्याकडे बघतच राहिले. पण सुबोधचा निश्चय पक्का होता. मन स्वच्छ केल्यानं चिन्मयचा वक्तशीरपणा, नम्र बोलणं, प्रत्येक विषय खोलात जाऊन समजून घेण्याची वृत्ती हे गुण त्याला नव्यानं कळले. तो ते आत्मसात करू लागला.’’

हां हां म्हणता वर्ष सरलं. नववीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालाचा दिवस उजाडला. हसतमुखानं उड्या मारत घरी येणाऱ्या सुबोधला बघून आई म्हणाली, ‘‘यावेळीही बाजी मारली वाटतं!’’

‘‘हो, पण मी नाही चिन्मयनं. माझा नंबर दुसरा आला.’’

आई आश्चर्यानं बघतच राहिली. तिनं सुबोधला पटकन जवळ घेतलं. म्हणाली, ‘‘बाळा, तू दुसरा नाहीस तर पहिला आला आहेस. जीवनाच्या परीक्षेत तू प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहेस. मनातील ईर्ष्येवर तू प्रयत्नपूर्वक विजय मिळवला आहेस, आता तुला कोणीही हरवू शकत नाही.’’

Waglesampada@gmail.com





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!