Homeपुणे / पिंपरी-चिंचवडराजू शेट्टी यांच्यामुळेच ‘महादेवी’ हत्तीण ‘वनतारा’मध्ये ; शिवसेनेच्या (शिंदे) नेत्याचा गंभीर आरोप

राजू शेट्टी यांच्यामुळेच ‘महादेवी’ हत्तीण ‘वनतारा’मध्ये ; शिवसेनेच्या (शिंदे) नेत्याचा गंभीर आरोप


पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर येथील नांदणी मठातून माधुरी ऊर्फ महादेवी हत्तिणीचे वनतारा येथे स्थलांतर करण्यात आले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एप्रिल २०१८ मध्ये वन विभागाला पत्र लिहून हत्ती ताब्यात घेण्याची मागणी केल्यानेच या प्रकरणाला सुरुवात झाल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

‘राजू शेट्टी केवळ राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाचा वापर करत आहेत. समाजाची दिशाभूल करून लोकभावना भडकावण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. या वेळी चेतन कोठारी उपस्थित होते.आंधळकर म्हणाले, ‘शेट्टी यांचे राजकीय अस्तित्व संपले आहे. त्यामुळे माधुरी हत्तिणीच्या ‘वनतारा’मध्ये झालेल्या स्थलांतराचा राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, एप्रिल २०१८ मध्ये शेट्टी यांनीच पत्र लिहून महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीचा तात्पुरता ताबा घेण्याची मागणी वन विभागाकडे केली होती.

त्यात माधुरी हत्तीण आजारी असून, वयोमानानुसार तिची देखभाल करण्यासाठीची व्यवस्था नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच, हत्तीण परत करण्याचा कोणताही उल्लेख या पत्रात शेट्टी यांनी केलेला नाही. त्यामुळे ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’सारख्या (पेटा) संघटनांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. शेट्टी यांच्या पत्रामुळेच हे प्रकरण बदलल्याचे आता समोर आले आहे. ‘पेटा’च्या प्रतिनिधींबरोबर त्यांची छायाचित्रे सार्वजनिक झाली आहेत. त्यामुळे स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी शेट्टींकडून अफवा पसरवण्यात येत आहेत.’

हेही वाचा

‘‘पेटा’वर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपही त्यातील एक भाग आहे. राजू शेट्टी यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद असतानाही तेथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा म्हणजे शेट्टी यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी केलेला ‘स्टंट’च होता. शेट्टी लोकांची दिशाभूल करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असून, हीच भूमिका ठेवल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा आंधळकर यांनी दिला.

‘नांदणी मठ हे श्रद्धास्थान असून, माधुरी हत्तीण हा श्रद्धेचा भाग आहे. जैन समाजाचा रोष कोणालाही परवडणार नाही. त्यामुळे नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी. हत्तीण परत आणावीच लागणार आहे. त्यात शंका नाही. मात्र, राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या भावनेचा गैरवापर करणे चुकीचे आहे. न्यायालयीन प्रक्रियेनेच हा विषय मार्गी लावायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘कायद्याच्या चौकटीत राहून हत्तीण माघारी आणण्यात यावी. त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ अशी भूमिका कोठारी यांनी मांडली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!