Homeपुणे / पिंपरी-चिंचवडकाळाचे गणित : पोपशाहीतला लोकशाही प्रयोग

काळाचे गणित : पोपशाहीतला लोकशाही प्रयोग


ज्युलियन कॅलेंडरमध्ये बदल अमलात आणले पोप ग्रेगरी – तेरावे यांनी. कोण होते हे पोप ग्रेगरी आणि त्यांनी हे बदल नेमके कसे अमलात आणले हे आज पाहू.

पोप ग्रेगरी हे बलोना विद्यापीठाचे स्नातक! त्यांनी विधिविषयक शिक्षण घेतलं होतं. काही काळ त्यांनी अध्यापनही केलं होतं! म्हणजे धर्मशास्त्रांप्रमाणेच आधुनिक विद्यांचाही त्यांचा अभ्यास होता.

पोप ग्रेगरी यांनी कॅलेंडरमधले बदल अमलात आणण्यासाठी जी पद्धत अवलंबली ती आदर्श म्हटली पाहिजे. महत्त्वाचे निर्णय घेताना काय काय आणि कसं कसं करावं याचा जणू वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.

सर्वप्रथम, पोप ग्रेगरींनी या विषयाचा अभ्यास करण्याकरिता विविध देशांमधून निवडलेल्या तत्कालीन विद्वानांची एक समिती स्थापन केली. या विद्वानांनी त्यांच्या त्यांच्या देशातल्या, प्रांतातल्या इतर तज्ज्ञांशी चर्चा करावी ही अपेक्षा होती. कॅलेंडर सुधारणांची सगळी सूत्रं ख्रिास्टोफर क्लेव्हियस या जर्मन विद्वानाकडे सोपवली. क्लेव्हियस हे आघाडीचे खगोलशास्त्रतज्ज्ञ तर होतेच पण उत्तम गणितीही होते.

हेही वाचा

उलटा चष्मा : ‘कारकुनी कट्ट्या’चे ‘खडे बोल

या सुधारणा काय असाव्यात याविषयी समितीत अंतर्भाव / नसलेल्या / तज्ज्ञांकडूनदेखील सूचना मागवल्या. अनेकांनी अशा सूचना केल्या. प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचा उपाय वेगळा. मग या सगळ्या गोष्टी एकत्र करून पोप ग्रेगरींनी ते बाड विविध विद्यापीठं, राजे, शासक यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रियांसाठी पाठवून दिलं.

समितीतल्या तज्ज्ञांचा स्वत:चा अभ्यास, त्यांनी इतर तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून झालेलं निष्पन्न, आणि विविध राजे, विद्यापीठं यांकडून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया! म्हणजे, केवढा माहितीचा साठा तयार झाला होता पाहा.

थोड्याशा दुरुस्तीसह जो प्रस्ताव अखेर अमलात आला तो अलॉयशियस लिलियस यांनी सुचवलेला होता. ४०० वर्षांत १०० नव्हे तर ९७ लीप वर्ष असावीत हा त्यांनी सुचवलेला तोडगा समितीने स्वीकारला. सध्याच्या कॅलेंडरमधून दहा दिवस गायब करावेत हा उपायही स्वीकारला. मात्र हे दहा दिवस एकदम गायब करू नयेत. त्याऐवजी पुढची दहा लीप वर्षे साधी वर्षे करावीत ही डॉक्टरसाहेबांची सूचना काही अमलात आली नाही. दहा दिवस एकरकमी गायब झाले.

ख्रिास्टोफर क्लेव्हियस यांनी ही सगळी तांत्रिक बाजू सांभाळली असली तरी या सुधारणा प्रत्यक्षात आणायची जबाबदारी ग्रेगरी यांचीच होती. आणि ती त्यांनी चोख पार पाडली. ‘काळाचे गणित’ नुसतं सोडवलं असं नाही, अगदी पायरी पायरीने सोडवलं. आणि या सगळ्याचं उत्तम दस्तावेजीकरणदेखील केलं!

धार्मिकबाबतीत गरजेनुसार विविध आदेश काढायचा अधिकार धर्मप्रमुख म्हणून पोप यांना असतो. यातल्या सर्वात महत्त्वाच्या आदेशांना ‘बुल’ म्हणतात. या कॅलेंडर सुधारणांकरिता पोप ग्रेगरी – तेरावे यांनी २४ फेब्रुवारी १५८२ रोजी असाच एक बुल जारी केला. काय होतं या बुलमध्ये?

सर्वप्रथम हा बुल जारी करण्याचा अधिकार पोप यांना कसा प्राप्त झाला, हा बुल जारी करण्यामागची कारणं या गोष्टी होत्या. त्यापुढे बदलाचे नियम स्पष्ट करून सांगणारे सहा अध्याय होते. बरं, या नियमांबाबत अधिक माहिती हवी तर कोणतं पुस्तक पाहावं हे सांगितलं होतं.

प्रत्यक्ष कालगणनेतला बदल व्यवस्थित वर्णन करून सांगितला होता. लीप वर्षांच्या गणनेत काय बदल होणार हे सोदाहरण दाखवलं होतं. या वर्षी कोणते दिवस गायब होणार हेदेखील सांगितलं होतं. त्या दिवसांत साजरे होणाऱ्या सणवारांचं काय करायचं याचा स्पष्ट उल्लेख होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘जुनं कॅलेंडर मोडीत निघालं’ असा स्पष्ट निर्वाळाही दिला होता.

‘पोप’ म्हणजे खरं तर तिथला सम्राट. धर्मप्रमुखही आणि राज्यप्रमुखही. असं असूनही आपल्या मर्यादांची जाणीव पोप ग्रेगरींना स्पष्ट होती. कारण धर्मविषयक प्रत्येक बाबीबाबत तपशीलवार सूचना देणारा हा बुल व्यावहारिक अडचणी मात्र न्यायाधीशांनी सोडवाव्यात असंही सांगतो. उदाहरणार्थ, ‘जी देणी त्या दहा दिवसांत द्यायची आहेत त्यांचं काय करायचं’, ‘ऑक्टोबर महिन्याचं भाडं पूर्ण भरायचं की दहा कमी दिवसांचा हिशेब करून’ असे सगळे प्रश्न न्यायाधीशांनी हाताळावेत असं सुचवलं होतं.

आणखी एक गमतीचा भाग होता. कोणालाही पोप महोदयांच्या परवानगीशिवाय नवं कॅलेंडर छापायला मनाई केली होती! हो, नाही तर कोणीही काहीही छापायचा आणि सगळा गोंधळ माजायचा!

हा बुल प्रत्यक्षात १ मार्च रोजी छापून सर्व प्रांताकडे, देशांकडे रवाना केला. म्हणजे बघा, बदल अमलात येण्यापूर्वी जवळजवळ नऊ महिने! त्या काळची परिस्थिती विचारात घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पुरेसा आधी हा बुल सर्वांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली होती.

खरोखर, हा मोठा बदल अमलात आणताना किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला होता हे पाहिलं की थक्क होतो आपण. राजेशाहीतदेखील एवढी पारदर्शक प्रक्रिया राबवणाऱ्या पोप ग्रेगरींचं नाव अजरामर झालं आहे ते योग्यच आहे!



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!