Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमोठी शिबिरे नको, पण दोन हजार युनिट रक्त हवे!

मोठी शिबिरे नको, पण दोन हजार युनिट रक्त हवे!


मुंबई : राज्यातील अनेक खासगी व सरकारी रक्तपेढ्या दरवर्षी किमान रक्त संकलन करण्याच्या नियमाला धाब्यावर बसवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वर्षाला किमान दाेन हजार युनिट रक्त संकलित करण्याच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना दिले आहे. मात्र, त्याचवेळी काहीच दिवसांपूर्वी पेढ्यांना रक्त वाया जाते म्हणून मोठी शिबिरे घेण्यासही मनाई केली आहे. नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात परवाना देताना वार्षिक दोन हजार युनिट रक्त संकलित करण्यात येईल, असे हमीपत्र रक्तपेढी चालवणाऱ्या संस्थांकडून लिहून घेण्यात येते. मात्र राज्यातील जवळपास ४० खासगी तर काही सरकारी रक्तपेढ्यांकडून या निमयांला धाब्यावर बसविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रक्तसंकलन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या असल्या तरी या रक्तपेढ्या त्याची अंमलबजावणी करत नाहीत.

या रक्तपेढ्या वर्षाला फक्त एक हजार ते १२०० युनिट रक्त संकलित करतात. त्यामुळे उन्हाळा, साथी या काळात रक्ताचा तुटवडा प्रकर्षाने निर्माण होतो. ही बाब लक्षात घेत राज्यातील कमी रक्त संकलित करणाऱ्या जवळपास ४० खासगी रक्तपेढ्या तर काही सरकारी रक्तपेढ्यांना वर्षाला दोन हजार युनिट रक्त संकलन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत. तसेच दोन हजार युनिट रक्त संकलन न करणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही परिषदेने दिला आहे.

हेही वाचा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये; एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला इशारा

मोठी शिबिरे घेण्यास मनाई

एकीकडे वर्षभरात किमान दोन हजार युनिट रक्त जमा करण्याचे आदेश पेढ्यांना देताना मोठी शिबिरे घेऊ नयेत, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. मोठ्या शिबिरांमध्ये रक्त संकलित होते. मात्र ते योग्य पद्धतीने न साठवल्यामुळे वाया जाते. त्यामुळे मोठी शिबिरे घेऊ नयेत असे परिषदेचे म्हणणे आहे. मात्र छोटी शिबिरे सातत्याने आयोजित करणे जिकीरीचे असल्याचे पेढ्यांचे म्हणणे आहे.

डिसेंबरपर्यंत मुदत

नोटीस पाठविण्यात आलेल्या ४० खासगी रक्तपेढ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत रक्त संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. या कालावधीमध्ये रक्त संकलन न करणाऱ्या रक्तपेढ्यांचा दर पाच वर्षांनी होणारे परवान्याचे नूतनीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी सांगितले.

रक्तपेढ्यांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ९० टक्के रक्तपेढ्यांनी नियमाची योग्य अंमलबजावणी केली तर उरलेल्या रक्तपेढ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल. – पुरुशोटम पुरी डॉ. सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!