Homeपुणे / पिंपरी-चिंचवडकाळाचे गणित: चुकीचं पण दीर्घायुषी!

काळाचे गणित: चुकीचं पण दीर्घायुषी!


ख्रिास्तपूर्व ४५ मध्ये अमलात आलेलं जूलियन कॅलेंडर सन १५८२ पर्यंत चाललं — जवळजवळ १६०० वर्षं. हे मोठं आश्चर्यच म्हटलं पाहिजे. कारण हे कॅलेंडर चुकीच्या गृहीतकावर आधारित होतं. आणि ही गोष्ट त्याच्या जन्माच्या वेळेसच माहीत होती!

आता दोन प्रश्न निर्माण झाले. मुळात चुकीच्या गृहीतकावर आधारित कॅलेंडर अमलातच का आणलं? बरं, आणलं ते आणलं, ते पुढे इतकी वर्षं वापरात का राहिलं? आज या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊ.

जूलियन कॅलेंडरच्या आधीची सगळी रोमन कॅलेंडरं चांद्र मास आणि सौर वर्ष अशी होती. त्या मालिकेतलं जूलियन कॅलेंडर हे पहिलं असं कॅलेंडर होतं ज्यात चांद्र मास या संकल्पनेला फाटा देण्यात आला होता. जूलियस सीझरला हा बदल करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

इजिप्तमधून! इजिप्तमध्ये ३६५ दिवसांचं सौर कॅलेंडर वापरात होतं. दर वर्षी तितकेच दिवस. अधिक महिना वगैरे काही भानगड नाही असं ते कॅलेंडर होतं. आणि सीझर तर स्वत: इजिप्तमध्ये गेला होता आणि तिथे त्याने दीर्घकाळ मुक्कामही केला होता. का?

सीझर सम्राट बनण्यापूर्वी रोममध्ये प्रजासत्ताक राज्य होतं. अर्थात, हे सगळं म्हणण्यापुरतं. सर्व सत्ता अवघ्या तीन माणसांच्या हातात एकवटलेली होती — जूलियस सीझर, क्रॉसस आणि पाँपे. क्रॉसस तर निवर्तला. पण पाँपे आणि सीझर यांच्यातला संघर्ष अगदी शिगेला पोहोचला. सीझरचं पारडं जड होतं आहे हे पाहताच पाँपे पळाला — ग्रीसमार्गे इजिप्तकडे. इजिप्तला पोचल्या दिवशीच प्रतिस्पर्ध्यांनी पाँपेचा काटा काढला. पण सीझर पाँपेच्या मागावर इजिप्तला पोचलाच.

आणि इथे सगळा ब्रह्मघोटाळा झाला! तिथे त्याची भेट झाली क्लिओपात्राशी. ही मिस्राी सुंदरी तिथली राणीही होती. सीझर तिच्या प्रेमात पडला. तिच्या वतीने तिच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढला. आणि तिला राणी म्हणून प्रस्थापित केलं. या काळात तिला त्याच्यापासून एक मुलगाही झाला. थोडक्यात, त्याचा इजिप्तमधला मुक्काम दीर्घकाळाचा होता.

या प्रदीर्घ मुक्कामात इजिप्शियन सौर कॅलेंडर त्याच्या निदर्शनास आलं असण्याची दाट शक्यता आहे. कारण जूलियन कॅलेंडरच्या निर्मितीत सीझरचा प्रमुख सल्लागार ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ सोसेजिनिस हा होता. हा माणूस तसं पाहता ग्रीक पण त्याचं वास्तव्य असे अलेक्झांड्रियामध्ये. याने सौर वर्षाचा कालावधी ३६५.२५ दिवसांचा असतो असं अनुमान बांधलं होतं. तोच मुख्य सल्लागार असल्यामुळे जूलियन कॅलेंडरसाठी वर्षाची लांबी तेवढीच धरली!

वास्तविक या सगळ्या घडामोडींपूर्वी सुमारे शे-दीडशे वर्ष हिप्पार्कस नावाच्या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने सौर वर्ष ३६५.२४६७ दिवसांचं असतं असा अधिक अचूक अंदाज वर्तवला होता. पण तरीही तो काही विचारात घेतला नाही.

म्हणजे, ना तो पाँपे इजिप्तला पळता, ना सीझर त्याच्या मागे जाता. ना तो सीझर इजिप्तला जाता, ना त्याला ती क्लिओपात्रा भेटती. ना तिची-त्याची भेट होती, ना तो इतका प्रदीर्घ मुक्काम करता. आणि मग कदाचित, हे कॅलेंडर या चुकीच्या गृहीतकावर आधारित नसतं! म्हणजे तात्पर्य काय, तर एका अर्थाने राजाचं प्रेमप्रकरण हे या घोडचुकीचं मुख्य कारण ठरलं!

दर ४०० वर्षांत हे कॅलेंडर तीन दिवस मागे पडे. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षं, काही शतकं हे कॅलेंडर आणि ऋतू यांचा घट्ट मेळ बसला आहे असं लोकांना वाटलं असेल तर त्यात काही नवल नाही. पण यातली चूक हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागली होती.

आठव्या शतकात बेडे नावाच्या इंग्लिश साधूने जूलियन कॅलेंडर आणि प्रत्यक्ष ऋतू यांत सुमारे तीन-चार दिवसांचं अंतर पडलं आहे हे दाखवून दिलं होतं. १३ व्या शतकात रॉजर बेकन या प्रख्यात इंग्लिश शास्त्रज्ञाने हे अंतर सात-आठ दिवसांचं आहे असा अंदाज वर्तवला होता. १४ व्या शतकात डांटे या इटालियन विचारवंताने कॅलेंडरमध्ये बदल करणं गरजेचं आहे हे सांगितलं.

पण तरीही तो बदल प्रत्यक्ष करण्यासाठी पुढची सुमारे २०० वर्ष वाट पाहावी लागली. का?

पहिलं कारण समाजाचं शैथिल्य. ‘चाललं आहे ते बरं चाललं आहे…’ अशीच समाजाची धारणा असते. कोणत्याही रचनेत काही बदल करणं समाज साधारणपणे टाळतो. कॅलेंडरसारख्या रोजच्या वापरातल्या, गरजेच्या विषयात तर बदलाला कडकडून विरोधच होतो.

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

दुसरं म्हणजे शास्त्रीय निकषांवर आधारित असे बदल स्वीकारायचे तर त्यासाठी समाजमन अधिक प्रगल्भ हवं. मागासलेल्या, बुरसट विचारांच्या समाजात असे बदल स्वीकारले जाण्याची शक्यता कमी. तेव्हा, युरोपात प्रबोधन युग बऱ्यापैकी प्रस्थापित झाल्यावर कॅलेंडरमधला हा बदल घडावा हा योगायोग नसावा!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!