गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तळ कोकण आणि किनारपट्टी भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आल
?
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे येत्या पाच दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून, त्यानंतर हळूहळू तो कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प, तलाव आणि नद्यांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांत नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, पुणे सातारा घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे – हवामान विभाग
30 जून रोजी राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तळ कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी हवामान विभागाने पावसाचा हायअलर्ट जारी केला आहे. तर 1 जुलै रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तळ कोकण, बहुतांश मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आणि संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






























