Homeदेश-विदेशराजस्थानचे राज्यपाल हरिभौ बागेडे यांनी दावा केला की जोध अकबर विवाह कथा...

राजस्थानचे राज्यपाल हरिभौ बागेडे यांनी दावा केला की जोध अकबर विवाह कथा आहे


ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे भारतीय इतिहासात अनेक चुका नोंदवल्या गेल्या आहेत असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajasthan Governor Haribhau Bagade) यांनी केला आहे. यामध्ये ज्यामध्ये जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले आहेत. उदयपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे यांनी अकबरनामामध्ये (Akbarnama) जोधा-अकबर यांच्या लग्नाचा (Jodha and Akbar marriage) उल्लेख नाही असा दावा केला.

“जोधा आणि अकबर यांचं लग्न झालं होतं असं म्हटलं जातं. त्यावर चित्रपटही तयार करण्यात आला आहे. इतिहासाची पुस्तकंही हीच गोष्ट सांगतात. पण हे सर्व खोटं आहे,” असं विधान हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे.

“भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीच्या मुलीचे लग्न अकबराशी लावून दिले,” असा दावा बागडे पुढे करतात. राज्यपालांच्या या विधानामुळे 1569 मध्ये आमेर शासक भारमलची मुलगी आणि अकबर यांच्यात लग्न झाल्याचा वाद पुन्हा वरती आली आहे.

सवाई जयसिंग दुसरे यांनी 1727 मध्ये जयपूरला राजधानी हलवण्यापूर्वी आमेर किंवा अंबर हे सध्याच्या जयपूरजवळील एक राजपूत राज्य होते आणि कचवाहा राजपूतांनी राज्य केले होते.

“इंग्रजांनी आपल्या वीरांचा इतिहास बदलला. त्यांनी तो योग्यरित्या लिहिला नाही आणि सुरुवातीला इतिहासात जे लिहिलं गेलं त्याला मान्यता देण्यात आली. नंतर काही भारतीयांनी इतिहास लिहिला, पण तो अजूनही ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होता,” असं राज्यपाल बागडे म्हणाले. राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तह पत्र लिहिले या ऐतिहासिक दाव्यालाही त्यांनी आव्हान दिले आणि ते पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं.

“महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल जास्त आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता परिस्थिती सुधारत आहे असंही त्यांनी मान्य केलं. “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढीला तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत,” असं ते म्हणाले.

राज्यपाल बागडे यांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशभक्तीचे प्रतीक म्हणून कौतुक केलं. “त्यांच्या जन्मात 90 वर्षांचे अंतर आहे. जर ते समकालीन असते तर देशाचा इतिहास वेगळा असता. दोघांकडे शौर्य आणि देशभक्तीच्या समान दृष्टिकोनाने पाहिले जाते,” असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे त्यांच्या सन्मानार्थ महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आज मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल:मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सतर्क राहावे, मंगळ...

0
आज (20 जून) रात्री मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ 2 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीतच राहील. मंगळाच्या या राशी बदलामुळे मिथुन, तूळ आणि कुंभ...

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज अंतिम फैसला:पक्षांतराच्या चर्चेमुळे ओमराजेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
नवी मुंबईच्या कळंबोलीत 2006 मध्ये भरदिवसा झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला आज दोन दशके पूर्ण झाल्यानंतर,...

देणगी चोरी प्रकरणी VHPने म्हटले- हिशोबासाठी ट्रस्ट जबाबदार:SITने तपासाची व्याप्ती वाढवावी, मंदिराच्या नावाखाली देणग्या...

0
हरिद्वारमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिपने अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या...
spot_img

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...
error: Content is protected !!