Homeदेश-विदेशबिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू यादव यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी; जाणून घ्या कोण...

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू यादव यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी; जाणून घ्या कोण आहे अनुष्का यादव, कोणाच्या प्रेमात आहे तेज प्रताप यादव?


लालू प्रसाद यांचा थोरला मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संदर्भातली माहिती दिलीय. 6 वर्षांसाठी तेजप्रताप यादव यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय… पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी केलीय. तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांचा एका तरूणीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत तेजप्रताप यांनी रिलेशेनशिपसंदर्भात भाष्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच पोस्टनंतर त्यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेजप्रताप यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर लगेचच लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली.

राष्ट्रीय जनता दलातून तेजप्रतापांची हकालपट्टी

वैयक्तिक जीवनात नैतिक मुल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. तेजप्रताप यादव यांचं कृत्यं आणि वागणं हे आमच्या कौटुंबिक मुल्य आणि संस्काराच्याविरोधात आहे. त्यामुळे त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. आता पक्ष आणि कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून  निलंबित करण्यात येत आहे. तेजप्रताप यांच्या फेसबुक अकाऊंटर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टनंतर ते अडचणीत आलेत. आणि त्यामुळेच त्यांच्यावर हीकारवाई करण्यात आलीय.

तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी

शनिवारी तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक
अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात
आला

या फोटोत तेजप्रताप हे एका तरूणीसोबत
दिसत आहेत

तेजप्रताप यादव यांच्यासोबत असेलल्या
तरुणीचं नाव अनुष्का यादव असल्याची
माहिती

12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत
असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात
आला होता

दरम्यान काही तासानंतर ही पोस्ट
फेसबुकवरून डिलिट करण्यात
आली

त्यानंतर माझं फेसबुक अकाऊंट हॅक
करण्यात आल्याचं तेजप्रताप यादव
यांनी सांगितलं

फोटो एआयच्या मदतीनं तयार करण्यात
आल्याचं स्पष्टीकरणही तेजप्रताप यांनी
दिलं

लालू प्रसाद यांचे साले म्हणजेच साधू यादव यांनी लालू प्रसाद यांनी घेतलेल्या निर्णयानंतर तेजप्रतापसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर टीका केलीय. तेजप्रताप मागील अनेक दिवसांपासून एका तरुणीसोबत राहत होता. लालू प्रसाद यादव यांना माहिती असूनही त्यांनी तेजप्रतापला 5 करोडचं हॉटेल बूक करून दिल्याचा आरोप साधू यादव यांनी केलाय.लालू प्रसाद यांनी त्यांच्या मुलाला कुटुंब आणि पक्षातून काढलं याच बिहारशी काय संबंध? यादव समाजातील एखादी नेता सक्षम असेल तर त्याला मुख्यमंत्री बनवणार असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी तो चेहरा जाहीर करावा जन सुराज पक्ष पाठिंबा देईल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

कोण आहे अनुष्का?

तेज प्रताप आणि अनुष्का यादव यांच्यातील नात्यावरून 24 मे पासून सोशल मीडियावर गोंधळ सुरू आहे. अनुष्कासोबतच्या त्याच्या नात्याचा खुलासा झाल्यानंतर, लोक प्रतिक्रिया देत आहेत की जेव्हा ते दोघेही 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्याने 2018 मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न का केले? लालू यादव नेहमीच सामाजिक न्यायाबद्दल बोलतात, या नात्यामुळे त्याला दुखापत झाली नाही का? अनेक लोक तर अशी प्रतिक्रिया देत आहेत की ऐश्वर्या राय त्याला तुरुंगात पाठवू शकते. याचे कारण म्हणजे ऐश्वर्या राय ही तेज प्रतापची विवाहित पत्नी आहे आणि हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न बेकायदेशीर आहे. तथापि, अनुष्का यादव आणि तेज प्रताप यादव यांचे नाते कोणत्या प्रकारचे आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही.

बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे तेजप्रताप यांची ही पोस्ट बिहारच्या राजकारणात वादंग निर्माण करू शकते. तसंच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून लालू प्रसाद यादव यांना घेरलं असतं त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!