Homeमनोरंजनबॉलिवूडमधील तरुण अभिनेता एकमेकांना भेटल्यानंतर सारा तेंडुलकर यांच्याशी ब्रेकअप केले, अभिनेत्याने अहवाल...

बॉलिवूडमधील तरुण अभिनेता एकमेकांना भेटल्यानंतर सारा तेंडुलकर यांच्याशी ब्रेकअप केले, अभिनेत्याने अहवाल तोडण्याचा निर्णय घेतला


सारा तेंडुलकर संबंध: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. कधी इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी कथित अफेअर्समुळे चर्चेत असलेल्या सारासंदर्भात एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. अगदी शुभमन गीलपासून ते वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर लिंकअप करण्यात आलेल्या साराचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण अगदी साराचे आई वडील म्हणजेच अंजली आणि सचिनपर्यंत पोहचलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी साराच्या प्रियकरानेच नकार दिला अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे साराचा हा प्रियकर एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

काही महिने सुरु होतं अफेअर

सारा तेंडुलकरला डेट करणाऱ्या या अभिनेत्यांचं सारासोबतचं अफेर काही महिने सुरु होतं. मात्र दोघांचेही पालक एकमेकांना भेटल्यानंतर या अभिनेत्यानेच नात्यातून माघार घेत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी ईटाइम्सने दिली आहे. ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, सिद्धार्थ चतुर्वेदी!

मे महिन्यात एकत्र दिसले

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘फिल्मफेअर’ने सिद्धार्थ आणि सारा एकत्र दिसल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र या दोघांनी कधीच यासंदर्भात सार्वजनिक पद्धतीने भाष्य केलं नाही. सिद्धार्थ हा बीग बी अमिताभ यांची नात नाव्या निलवाणीला डेट करत असल्याचीही चर्चा होती. तर दुसरीकडे सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या कथित अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र या दोन्ही जोडप्यांनी आपल्या नात्याबद्दल कोणतही भाष्य केलं नव्हतं.

एकमेकांच्या घरच्यांना भेटले अन्…

सारासोबतचं नातं पुढे न्यायचं नाही असं सिद्धार्थनेच ठरवलं, असं ‘ईटाइम्स’ने म्हटलं आहे. या दोघांचं ब्रेकअप नेमकं का झालं हे स्पष्ट झालेलं नाही. तरीही या वेबसाईटने सदर प्रकरणाशीसंबंधित निकटवर्तीयने, “दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे. सिद्धार्थने नातं संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला. दोघेही एकमेकांच्या घरच्यांना भेटल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला,” असं सांगितलं. दोघेही एकमेकांच्या घरच्यांना भेटल्यानंतर त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतल्याचं निकटवर्तीयाने स्पष्ट केलं.

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ आता लवकरच ‘धकड 2’ आणि ‘दिल का दरवाजा खोलो ना डार्लिंग’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.  ‘धकड 2’मध्ये सिद्धार्थ तृप्ती डिमरीसोबत झळकणार आहे. तर ‘दिल का दरवाजा खोलो ना डार्लिंग’ चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि कामिका गाबी दिसणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!