HomeमनोरंजनBCCI finally breaks silence on not playing Asia Cup 2025, know whether...

BCCI finally breaks silence on not playing Asia Cup 2025, know whether Team India will play or not | महत्त्वाची बातमी! Asia Cup 2025 न खेळण्याबाबत BCCI ने अखेरीस सोडले मौन, जाणून घ्या टीम इंडिया खेळणार की नाही


भारत सहभागी एशिया कप 2025: भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट संघाबद्दल अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. अशीच एक चर्चा सोमवारी समोर आली की भारतीय क्रिकेट संघ यावर्षी आशिया कप आणि महिला इमर्जिंग संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही.  मीडिया रिपोर्ट्समध्येही असेच दावे सोमवारी करण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण आता बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्वतः हे दावे फेटाळून लावले आहेत.  देवजीत सैकिया म्हणाले की, ” ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि आशिया कपमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही बैठकही झालेली नाही.”

काय म्हणाले BCCI चे सचिव?

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना देवजीत सैकिया म्हणाले की, “आज सकाळपासून अशी बातमी समोर येत आहे की BCCI ने पुरुष आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स एशिया कपसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही स्पर्धा Asian Cricket Council (ACC) अंतर्गत येतात. मात्र, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की या बातम्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही.”

हे ही वाचा: Mitchell Marsh: मिशेल मार्शने ठोकला 500000 रुपयांचा सिक्स, बुलेट शॉटने नवी कोरी कार डॅमेज; Video Viral

ते पुढे म्हणाले, “आशिया कपमध्ये सहभागी व्हायचं की नाही, यासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही.”

IPL आणि इंग्लंड मालिकेकडे लक्ष

सैकिया यांनी स्पष्ट केलं की सध्या बीसीसीआयचं  (BCCI) पूर्ण लक्ष IPL 2025 आणि इंग्लंडविरुद्ध पुरुष व महिला मालिका यांच्यावर केंद्रित आहे. त्यामुळे ACCच्या स्पर्धांबाबत अद्याप कोणताही विचार वा निर्णय झालेला नाही.

हे ही वाचा: आधीच 27 कोटीचा खर्च त्यात दिग्वेशला रोज होणारा दंड… राठी अन् अभिषेकचा मैदानातच राडा, Video पाहून चाहत्यांचा संताप

कधी होणार आहे आशिया कप 2025

आशिया कप 2025 हे या स्पर्धेचं 17वं सीजन असणार आहे. मात्र, या स्पर्धेचं यजमानपद अद्याप जाहीर झालेलं नाही. या वर्षी  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि यूएई असे एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

हे ही वाचा: LSG vs SRH: जादू-मंतर की तंत्र-मंत्र? संजय गोयंका सामना सुरु असताना कोणासमोर वाकले? फोटो Viral

दुसरीकडे, महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप 2025 ची यजमानी श्रीलंका करणार आहे. या स्पर्धेचं पहिलं आयोजन 2023 मध्ये झालं होतं, जिथे अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघाने बांगलादेशला 31 धावांनी पराभूत करून जेतेपद पटकावलं होतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!