Homeदेश-विदेशजम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरनंतर इंडियन आर्मीने ऑपरेशन केलर...

जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरनंतर इंडियन आर्मीने ऑपरेशन केलर सुरू केले


महत्त्वाचे मुद्दे

    भारतीय सैन्य ऑपरेशन केलर: (Jammu and Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं बैसरन व्हॅलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. ज्यानंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून भारतीय लष्करानं ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच केलं. परिस्थिती दर दिवसागणिक चिघळत गेली. पाकिस्ताननंही भारतावर ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न केला. इथं पाकला सडेतोड उत्तर देत भारतानं अखेर शेजारी राष्ट्राला नमतं घेण्यास भाग पाडलं आणि आणखी एका मोठ्या बातमीनं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं.

    भारतीय सैन्यदलानं दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणखी एक मोठी मोहित हाती घेत कोणतीही दहशतवादी कारवाई ‘अॅक्ट ऑफ वॉर’ ग्राह्य धरली जाणार असल्याचं ठणावून सांगितलं आणि ‘ऑपरेशन केलर’ लाँच केलं.

    जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा…

    भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढच्या 48 तासांमध्ये काश्मीरच्या शोपियां भागात एका चकमकीमध्ये सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाच्या ऑपरेशनल कमांडरसह 3 घातक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात दहशकवादी लपून बसल्याची माहिती मिळतात ‘शोधा आणि संपवा’ या त्तत्वानिशी एक मोहिम हाती घेतली. दक्षिम काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील केलर गावातील शुकरूच्या वनक्षेत्रामध्ये हे दहशतवादी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून आसरा घेत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती, जिथं त्यांचा तातडीनं शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

    काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष…

    13 मे रोजी गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीनं ‘सर्च एंड डिस्ट्रॉय ऑपरेशन’ लाँच केलं. ज्यानंतर भारतीय सैन्यदलानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेचा एक फोटोसुद्धा शेअर केला. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू झाला आणि अखेर सैन्याच्या गोळीबारानं या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला, ज्यामध्ये लष्करचा ऑपरेशनल चीफ शाहिद कुट्टेसुद्धा सहभागी असल्याचं पाहायला मिळालं. शाहिद चोटीपोरा हीरपोरा (शोपियां) येथीलच रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं.

    यंत्रणांकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 8 मार्च 2023 पासून तो दहशतवादी संघटनांसाठी काम करू लागला. सूत्रांच्या माहितीनुसार तो दहशतवाद्यांच्या कॅटेगरी A मधील दहशतवादी असून 8 एप्रिल 2024 ला डॅनिश रिसॉर्ट येथील गोळीबारामध्येही तो सहभागी होता. तर, 18 मे 2024 मध्ये शोपियांतील हीरपोरामध्ये भाजप सरपंचांच्या हत्येतही त्याचा सगभाग होता. अनेक दहशतवादी कारवायांशी त्याचं नाव जोडलं गेल्यामुळं त्याचा खात्मा करत या भागास सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांच्या नेटवर्कला सैन्यानं एक कठोर इशाराच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!