Homeमनोरंजनभारत पाकिस्तान युद्ध पीएसएल न्यूज मी पुन्हा पाकिस्तानला जाणार नाही न्यूझीलंड डॅरेल...

भारत पाकिस्तान युद्ध पीएसएल न्यूज मी पुन्हा पाकिस्तानला जाणार नाही न्यूझीलंड डॅरेल मिशेल टॉम कुरन विमानतळ बंद झाल्यानंतर बाळाप्रमाणे ओरडले


पीएसएल न्यूज इंडिया पाकिस्तान युद्ध: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिचेलने पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली आहे. क्रिकेट खेळण्यासाठी आपण पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं डॅरेल मिचेल जाहीर केलं आहे. दुसरीकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करन हा अगदी ‘लहान बाळाप्रमाणे रडू’ लागल्याची बातमी समोर येत आहे. भारत पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानमधील जवळपास सर्वच विमानतळं बंद करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानी प्रिमिअर लीग स्पर्धेसाठी पाकिस्तानात गेलेले अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तानात अडकून पडले. भारत-पाकिस्तानदरम्यान युद्ध सुरु असून विमानतळं बंद असल्याचं समजल्यानंतर डॅरेल मिचेल आणि टॉम करन यांची काय अवस्था झाली होती याबद्दल बांगलादेशी फिरकीपटू रशीद हुसैन याने सांगितलं आहे.

परिस्थिती चिघळली आणि स्पर्धा पुढे ढकलली

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने 6 ते 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध या कारवाईनंतर कामालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांकडून लष्करी कारवाया सुरु झाल्यानंतर पाकिस्तान प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आधी पाकिस्तान प्रिमिअर लीग संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला हलवण्याचा विचार केला. मात्र एमिरिट्स क्रिकेट बोर्डाने ही ऑफर फेटाळून लावली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका आठवड्यासाठी इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांना थांबवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानी प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थागित करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं.

मोठा धक्का बसला

पाकिस्तान प्रिमिअर लीगमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंना स्पर्धा स्थगित झाल्यानंतर युएईवरुन कनेक्टेड फ्लाइट्सने त्यांच्या त्यांच्या देशांमध्ये पाठवण्यात आलं. बांगलादेशी फिरकीपटू रशीद हुसैन हा या स्पर्धेमध्ये ‘लाहोर कलंदर्स’च्या संघातून खेळत होता. ज्या विमानतळावरुन परदेशी खेळाडूंच्या चार्टड विमानाने उड्डाण घेतलं ते विमानतळ पुढल्या 20 मिनिटांमध्ये मिसाईल हल्ल्यात उद्धवस्त झाल्याचं ऐकून आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला होता, असं रशीद हुसैनने सांगितलं.

उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांनी मिसाईल हल्ला

“दुबईमध्ये आमचं विमान उतरल्यानंतर ज्या विमानतळावरुन आम्ही उड्डाण केलं होतं त्या विमानतळावर आम्ही उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांनी मिसाईल हल्ला झाल्याचं समजलं. ही बातमी आमच्यासाठी फारच धक्कादायक होती. आता दुबईत परतल्याने थोडा दिलासा मिळाला आहे,” असं रशीद हुसैन ‘क्रिकबझ’शी संवाद साधताना म्हणाला. “मी कुठेही क्रिकेट खेळायला जातो तेव्हा माझ्या कुटुंबाला तेथील परिस्थिती कशी असेल याची चिंता वाटतो. आता त्याना पाकिस्तानमधील बातम्या कळल्या. बॉम्बस्फोट, मिसाईल हल्ल्यांबद्दल कळाल्याने ते चिंतेत आहेत. मी फोन करुन त्यांच्याशी बोललो आणि त्यांना चिंता करु नये असं सांगितल्यावर त्यांना दिलासा मिळाला आहे,” असंही रशीद हुसैन म्हणाला.

पुन्हा कधीच पाकिस्तानात येणार नाही, खास करुन…

‘लाहोर कलंदर्स’च्या संघातून खेळणारे रशीद हुसैनचा सहकारी डॅरेल मिचेलने पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतल्याचंही त्याने सांगितलं. “सॅम बिलिंग्स, डॅरेल मिचेल, कुशल परेरा, डेव्हिड विस्ली, टॉम करन यासारख्या परदेशी खेळाडूंची भितीने गाळण उडाली. दुबईमध्ये परतल्यानंतर डॅरेल मिचेलने मला तो यापुढे कधीच पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं सांगितलं. खास करुन अशा परिस्थितीत आपली तेथे जाण्याची इच्छा नाही असं तो मला म्हणाला. ते सर्वचजण खूप घाबरलेले होते,” असं रशीद हुसैनने सांगितलं.

लहान मुलासारखा रडू लागला

टॉम करनबद्दल बोलवताना रशीद हुसैनने, “तो विमानतळावर पोहोचला. मात्र विमानतळ बंद असल्याचं समजल्यानंतर तो लहान मुलासारखा रडू लागला. तीन ते चार जणांनी त्याला धीर दिल्यावर तो शांत झाला,” असं सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!