Homeमनोरंजनफोन 100 टक्के चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं! जाणून घ्या मोबाईल चार्जिंगचे...

फोन 100 टक्के चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं! जाणून घ्या मोबाईल चार्जिंगचे योग्य नियम


आजच्या काळात मोबाईलशिवाय जीवन अशक्य झाले आहे. कॉल्स, चॅटिंग, कामं, बँकिंग, GPS, फोटो आणि अगदी आरोग्याशी संबंधित अ‍ॅप्ससुद्धा या मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे फोन सोबतच त्याची बॅटरी टिकवणं ही गरज बनली आहे.

बॅटरी खराब होण्याची कारणं:
1. 100 टक्के चार्जिंग- लिथियम आयन बॅटरीसाठी पूर्ण चार्जिंग योग्य नाही. यामुळे बॅटरी फुगू लागते.
2. रात्रभर चार्जिंग- रात्रभर फोन चार्जिंगला लावल्यामुळे ट्रिकल चार्जिंग सुरू राहतं. जे बॅटरीचे नुकसान करते.
3. फास्ट चार्जिंगचा अति वापर- गरज नसताना वारंवार फास्ट चार्जिंग केल्याने बॅटरी गरम होते आणि लवकर खराब होण्याचा धोका वाढतो.
4. गरम वातावरणात चार्जिंग करणे म्हणजेच उन्हात किंवा उष्ण ठिकाणी फोन चार्जिंगला लावणे टाळा.
5. खोट्या किंवा डुप्लिकेट चार्जरचा वापर अत्यंत धोकादायक असते. यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.

मोबाईल बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी टिप्स:
चार्जिंग रेंज योग्य ठेवा. 20 टक्के ते 80 टक्के ही रेंज बॅटरीसाठी सर्वोत्तम मानली जाते. यामुळे चार्जिंग सायकल जास्त काळ टिकते.
स्मार्ट चार्जिंग वापरा. अनेक मोबाईल ब्रँड्स आता Optimized Charging फीचर देतात. याचा उपयोग केल्यास बॅटरी गरजेनुसार चार्ज होते.
फोन उष्णतेपासून वाचवा. गरम ठिकाणी फोन ठेवू नका. चार्जिंगदरम्यान मोबाइलच्या कव्हरचा वापर टाळल्यास उष्णता राहणार नाही.
बॅटरी सेव्हिंग मोड वापरा. विशेषतः बॅटरी कमी असताना हे मोड्स वापरल्यास चार्जिंग दीर्घकाळ टिकते.
ब्लूटूथ, Wi-Fi, लोकेशन गरज नसताना बंद ठेवा. यामुळे बॅटरीचा अपव्यय टाळता येतो.
‘डार्क मोड’ आणि ‘अ‍ॅडाप्टिव्ह ब्राईटनेस’ चा वापर करा. हे फीचर्स स्क्रीनवरील उजेड कमी करून बॅटरी वाचवतात.

खास लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी मोबाईलच्या सेटिंगमध्ये असलेली माहिती (जसे iPhone मध्ये Battery Health) नियमितपणे पाहा.
नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स इन्स्टॉल करत राहा. कारण त्यात बॅटरी व्यवस्थापन सुधारलेले असते.
जर बॅटरी लवकर संपत असेल, फोन खूप गरम होत असेल किंवा चार्ज हळूहळू होत असेल. तर शक्यतो सर्व्हिस सेंटरलाच भेट द्या.

100 टक्के चार्जिंग ही चुकीची सवय आहे. फोन लवकर खराब होण्यामागे हेच एक मोठी कारणं आहे. स्मार्टफोनची दीर्घायुष्यासाठी 20 टक्के ते 80 टक्के चार्जिंग पद्धत अवलंबा आणि अनावश्यक चार्जिंग सवयी टाळा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!