IND VS NZ T20 पहिला सामना : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना बुधवार 21 जानेवारी रोजी पार पडला. नागपूरच्या विदर्भ स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला असून यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं आणि ते फक्त 190 धावांच करू शकले. त्यामुळे टीम इंडियाचा 48 धावांनी विजय झाला. यासह टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टॉस न्यूझीलंडने जिंकून त्यांनी प्रथमी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने केवळ 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. तसेच चार चौकार आणि चार षटकार सुद्धा लगावले आणि युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला. तर अभिषेकनंतर रिंकू सिंहने 44, हार्दिक पंड्याने 25, सूर्यकुमार यादवने 32, संजू सॅमसनने 10 धावा केल्या. टीम इंडियाने 7 विकेट गमावून 238 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिले.
भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना सर्वाधिक 78 धावांची कामगिरी ग्लेन फिलिप्सने केली. मार्क चॅपमनने 39, डॅरिल मिशेलने 28, मिचेल सँटनरने 20, टिम रॉबिन्सनने 21 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या 7 विकेट घेतल्या.
भारताची प्लेईंग ११:
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेम्सन, ईश सोधी, जेकब डफी





























