HomeमनोरंजनCrime News मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून सुमारे 2 कोटी रुपयांचे 1650 चोरीचे...

Crime News मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून सुमारे 2 कोटी रुपयांचे 1650 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.


Crime News मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. आज हातावारील या पाच इंचाच्या स्क्रीनवर सारं जग सामावलं आहे. हल्ली अगदी दहा हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच स्मार्टफोन वापरणारे लोक आहेत. मात्र मुंबईसारख्या शहरांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन फोनवर डल्ला मारणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईत मोबाईल फोन चोरीचं प्रमाण बरचं अधिक आहे. रेल्वे स्थानक, बस, सार्वजनिक वाहतूक सेवा असो किंवा मॉल, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये असो मोबाईल कुठूनही लंपास केला जाऊ शकतो. त्यातही मुंबईसारख्या शहरात एकदा मोबाईल चोरीला गेला की तो परत मिळणं कठीण मानलं जातं. मात्र मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरीला गेलेल्यांना एक सुखद धक्का दिला असून तब्बल 2 कोटी रुपयांचे 1650 चोरीला गेलेले स्मार्टफोन बिहारमधून जप्त केले आहेत. मुंबईतून चोरलेले हे फोन पोलीस आता पुन्हा मूळ मालकांना परत करणार आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकी काय माहिती दिली मुंबई पोलिसांनी?

“मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले. 1650 फोन पुन्हा मुंबईत आणण्यात आले,” अशी कॅप्शनसहीत मुंबई पोलिसांच्या अधिकृत हॅण्डलवर उत्तर प्रदेशमधून परत आणलेल्या मोबाईल्सचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. “विशेष मोहिमेअंतर्गत 2 कोटींच्या आसपास एकूण किंमत असलेले आणि मुंबईमधून चोरीला गेलेले 1650 मोबाईल फोन उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागातून पुन्हा मुंबईत आणण्यात आले आहेत,” असंही पोलिसांनी शेअर केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. “आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 33 हजार 514 हरवलेले मोबाईल फोन मूळ मालकांना विशेष मोहिमेअंतर्गत परत केले आहेत,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

कसे शोधले हे फोन?

दूरसंचार विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीईआयआर (CEIR) या पोर्टलद्वारे आयएमईआय (IMEI) क्रमांकांच्या माध्यमातून या फोनचा शोध घेण्यात आला. या आंतरराज्यीय कारवाईला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मंजुरी दिली होती. जप्त केलेले फोन पडताळणीनंतर मूळ मालकांना परत केले जात आहेत. विशेष म्हणजे अनेक फोन चोरीला गेल्यानंतर महिन्यांनी परत मिळाले आहेत. याचा अर्थ असा की फोन चोरीला गेल्यानंतर बराच काळ त्यांना ट्रॅक करता येतं.

राज्याचा उल्लेख करण्यात आल्यावरुन दुमत

मात्र आता या पोस्टनंतर फोन कुठून मिळाले याचा उल्लेख टाळता आला असता असं म्हटलं आहे.

तर अनेकांनी उत्तर प्रदेशामध्येच हा चोरलेला माल कसा पोहोचतो असा सवाल उपस्थित केला आहे. “मुंबईतून चोरीला गेलेले 1650 फोन उत्तर प्रदेशमध्ये सापडले. आणि उत्तर भारतीयांना मुंबईत येऊन निवडणूक लढवून मुंबईचा विकास करायचा आहे. धन्यवाद, मुंबई पोलिसांचे ही महत्वाची बातमी शेअर केल्याबद्दल!” असं एकाने या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं आहे.

दरम्यान, हरवलेला मोबाईल तातडीने परत मिळवायचा असेल तर फोन हरवल्यानंतर लवकरात लवकर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची रितसर तक्रार नोंदवणं आवश्यक असतं हे सर्वसामान्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...
spot_img

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
error: Content is protected !!