Homeमनोरंजनअन्न पाहताना मोबाईल वापरल्याने आरोग्यावर परिणाम

अन्न पाहताना मोबाईल वापरल्याने आरोग्यावर परिणाम


जेवताना रील पाहणे: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, असं वाक्य एका मराठी चित्रपटात आहे. खरोखरच आज मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कामांसाठी ही पाच इंचाची स्क्रीन आपल्याला आपल्या हातात किंवा खिशात हवीच असते. मग ते फोन कॉलसारखं बेसिक फिचर असो किंवा अगदी जेवताना रिल्स बघणं असो, मोबाईल मस्ट आहे!

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सगळं काही रील स्क्रोल करत

आपल्यापैकी अनेकजण जेवताना किंवा इतर छोटी-मोठी काम करताना जसं चहा पिताना गैरे निवांत रील स्क्रोल करत बसलेलो असतो. हल्ली ही सवय फार सामान्य झाली आहे. तुम्ही हॉटेलमध्ये बघा किंवा ऑफिस कॅन्टीनमध्ये बघा सगळीकडे अशी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली मंडळी दिसतील. मात्र ही सवय अगदी सहज सोपी कृती असून दैनंदिन जीवनाचा भाग झालेली असली तरी त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. एका नव्या संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे.

कोणी केलाय हा अभ्यास?

‘हेल्थलाइन’मधील एका आरोग्यविषय अहवालानुसार, बीजिंग विद्यापीठाने रिल्स स्क्रोल करण्यासंदर्भातील विषयावर एक अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कार्षांमधून असे दिसून आले की जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहणे शरीरावर फारच नकारात्मक परिणाम करतं.

अहवालात काय होते?

बीजिंग विद्यापीठातील या संशोधनातून असे दिसून आले की, जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहिल्याने आपलं लक्ष अन्नापासून विचलित करते. अशाप्रकारे पूर्ण लक्ष अन्नावर न ठेवता ते सेवन केल्याने आपल्या मेंदूला जेवल्याचं समाधान मिळत नाही. आपला मेंदू फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही बरीच ऊर्जा खर्च करतो. यामुळेच जेवणानंतर तृप्ततेचा संकेत देणाऱ्या हार्मोन्सचे योग्यरित्या उत्सर्जित होत नाहीत. परिणामी, व्यक्तीची भूक हळूहळू कमी होते.

काय परिणाम होतात?

जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाच्या सुगंधाची आणि चवीची जाणीव कमी होऊ शकते. यामुळे हळूहळू खाण्याचा आनंद कमी होतो. याचा दुरोगामी परिणाम असा होतो की लोक प्रक्रिया केलेले आणि बाहेरील अन्न पसंत करू लागतात. या पद्धतीनं बराच काळ राहिल्यास चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे शेवटी आरोग्य बिघडते. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.

या समस्याही बळावतात

जेवणादरम्यान जास्त स्क्रीन टाइममुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असे नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब या सारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील वाढतो. याचसंदर्भातील अजून एक समस्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव! हल्ली हा अभाव लोकांमध्ये खूप दिसून येतो. या एकग्रतेच्या अभावामुळे एक तर लवकर किंवा खूप हळू जेवण जातो. यामुळे टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढतो. शिवाय, याचा जीवनशैलीवरही परिणाम होतो.

आता हे एवढे तोटे पाहता जेवताना मोबाईल दूर ठेवलेलाच बरा, नाही का?





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

मौलानाचे वादग्रस्त विधान- श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे:लखनौमध्ये आंदोलन, संतांनी सांगितले –...

0
यूपीमधील इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केले आहे. मौलाना म्हणाले, भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते आणि दिवसातून 5...
spot_img

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...

विप्रोला पहिल्या तिमाहीत ₹3,352 कोटींचा नफा:महसूल 10% वाढला, कंपनीने ₹2 लाभांश जाहीर केला; ॲट्रिशन...

0
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक...
error: Content is protected !!