Homeमहाराष्ट्र1 जुलैपासून एसटी तिकीट दरात मोठा बदल, 'या' प्रवाशांना मिळणार 15 टक्के...

1 जुलैपासून एसटी तिकीट दरात मोठा बदल, ‘या’ प्रवाशांना मिळणार 15 टक्के सूट!


एसटी तिकिट भाडे सवलत: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला एसटी खूप फायद्याची ठरते. स्वस्त दरात सुरक्षित प्रवासासाठी तुम्हाला एसटी उपयोगी पडते. महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 कि.मी.पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास तुम्हाला फायदा मिळणार आहे.

सवलतधारक प्रवासी वगळून प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. असे असले तरी ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ

येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1जुलै) लागू होत आहे. असे असले तरी जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

‘मुंबई 1’ कार्डवर आता एसटीचे तिकीट बुक करता येणार

मेट्रो आणि लोकलप्रमाणे एसटीचे तिकीटदेखील यूपीआय व इतर संकेतस्थळांद्वारे ऑनलाइन काढता येते. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून, एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेनुसार एसटी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे. यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही. एकच कार्ड सर्वत्र चालणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे.

एनसीएमसी कार्ड म्हणजे काय?

केंद्र सरकारने सुरू केलेली एकसंध डिजिटल पेमेंट प्रणाली
एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येते
एनएफसी  तंत्रज्ञानावर आधारित
रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची सोय
रोख रकमेची गरज नाही, डिजिटल व्यवहाराला चालना

एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलती अशा विविध योजनेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे.

राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 40 भाविकांच्या ग्रुपने लालपरी बुक केल्यास त्यांना आषाढी यात्रेला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. एसटीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!