Homeमहाराष्ट्ररेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र

रेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र


मुंबई : लोकल दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. तर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतल्या दिव्या आणि मुंब्रादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. या लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 9 प्रवासी हे जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. देशाचे रेलमंत्री नव्हे तर रिलमंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलं. तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील रेल्वे प्रशानावर खापर फोडलं आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणारे लोंढ्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  दरम्यान या घटनेची रेल्वे मंत्रालयांकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

दिवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिव्यापासून काही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच कल्याण, डोंबिवलीमध्येच लोकल फुल होतात त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्र्यात प्रवाशांसाठी जागाच शिल्लक राहतात नाही. त्यामुळे लोक जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.

लोकल दुर्घटनेची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. कसारा, खोपली, पालघर, विरारवरून मुंबईत येण्यासाठी एकमेव पर्याय हा लोकलच आहे. या परिसरात देखील गर्दी वाढतेय. मात्र, लोकल मर्यादितच आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासन कसं नियंत्रण मिळवणार? असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना रेल्वे प्रशासनानं कराव्यात जेणेकरून वारंवार अशा घटना होणार नाहीत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!