श्रीदेवी यांनी या अभिनेत्यासाठी उपवास केला: बॉलिवूडच्या दिग्गज आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांचा अभिनय त्यांची सुंदरता आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. पण आज आपण अशा एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यासाठी अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकदा 7 दिवसांचा उपवासदेखील केला होता. एवढंच नाही, तर त्या दररोज देवळात जाऊन त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होत्या.
श्रीदेवी आता आपल्यात नाहीत, पण त्यांचे चित्रपट, त्यांची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यांनी निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांचं वैवाहिक आयुष्यही आनंदी होतं. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की श्रीदेवी यांचं नाव एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं.
आपण बोलतोय सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल. रिपोर्ट्सनुसार, एकदा रजनीकांत यांची तब्येत खूपच खराब झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हे कळताच श्रीदेवी यांनी साईबाबांकडे मन्नत मागितली आणि सात दिवसांचा उपवास केला.
इतकंच नाही तर त्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही गेल्या होत्या. त्यांच्यासाठी श्रीदेवी यांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेचा परिणाम म्हणूनच की काय, पण रजनीकांत लवकर बरे झाले. असं म्हटलं जातं की रजनीकांत आणि श्रीदेवी यांचं नातं खूप खास होतं. रजनीकांत त्यांचा खूप आदर करत आणि काळजीही घेत होते.
श्रीदेवी आणि रजनीकांत यांनी एकत्र 19 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जवळिकीबद्दल बरीच चर्चा होती. इतकी की रजनीकांत यांनी एकदा लग्नाची विचारणा करण्याचा निर्णय घेतला होता. पण अशी एक घटना घडली आणि तो विषय तिथेच थांबला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. बालाचंदर यांनी एकदा सांगितलं होतं की, रजनीकांत श्रीदेवीं यांचा हात मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पण जसेच ते घरात शिरले, लाईट गेली. हे पाहून रजनीकांत यांनी ते अपशकुन मानलं आणि तिथून निघून गेले.
हेही वाचा : समांथानं मिटवली नागा चैतन्यची अखेरची निशाणी, दिग्दर्शकाला डेटिंग ठरलं कारण? चाहते म्हणाले…
त्यानंतर पुन्हा कधीही लग्नाची गोष्ट पुढे आली नाही. त्यानंतर 1996 मध्ये श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. तेव्हा बोनी कपूर आधीच विवाहित होते, पण तरीही त्यांचं आणि श्रीदेवीचं प्रेम जडलं आणि त्यातून एक नवं नातं निर्माण झालं.




























