Homeमनोरंजनटीम इंडिया NRR ची कशी सुधारणा झाली आहे जी दक्षिण आफ्रिका टी-20...

टीम इंडिया NRR ची कशी सुधारणा झाली आहे जी दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक 2026 विरुद्ध 76 धावांनी गमावलेल्या सामन्यानंतर घसरली आहे


IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात रविवार 22 फेब्रुवारी रोजी सुपर 8 चा सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा (Team India) 76 धावांनी पराभव करून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला, एवढंच नाही तर यासोबतच संघाचा नेट रन रेट सुद्धा बराच खाली आला एवढा की आता टीम इंडियाला केवळ उर्वरित दोन सामने जिंकून चालणार नाही तर त्यांना नेट रन रेट (NRR) सुद्धा वाढेल अशी कामगिरी करावी लागेल. मात्र हे सगळं फक्त परफॉर्मन्सवर नाही तर काही अंशी नशिबावर सुद्धा अवलंबून असणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टीम इंडियाचा नेट रन रेट निगेटिव्हमध्ये :

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 स्टेजमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून फक्त पराभवच झाला नाही तर त्यांच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुद्धा धक्का बसलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी मोठा पराभव झाल्यावर टीम इंडियाचा नेट रन रेट आता -3.800 धावांपर्यंत खाली आलाय. तिथेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा नेट रन रेट हा +3.800 वर पोहोचलाय. ग्रुप 1 मध्ये आता भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता भारताला या दोन संघांविरुद्ध सामना जिंकावाच लागेल मात्र सोबतच नेट रन रेट सुद्धा सुधारावा लागेल. कारण जर पॉईंट्स बरोबरीवर असतील तर नेट रन रेटच्या आधारेच सेमी फायनलचं क्वालिफिकेशन होईल.

नेट रन रेट वाढवणार टेन्शन :

प्रत्येक संघाचा नेट रन रेट हा स्पर्धेत संघाने केलेल्या धावांना त्यांनी केलेल्या षटकांच्या संख्येने भागून मोजला जातो. मग विरोधी संघांविरुद्ध दिलेल्या धावांची सरासरी वजा केली जाते. जर संघ ऑल आउट झाला किंवा विरोधी संघ लवकर ऑल आउट झाला तर नेट रन रेटमध्ये मोठा फरक पडतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडियाला ऑल आउटचा सामना करावा लागला. ज्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट हा खूप जास्त खराब झालाय. भारताला आता सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने हे मोठ्या मार्जिनने जिंकावे लागतील.

हेही वाचा : IND VS SA मॅचमध्ये राडा, दोन्ही संघाचे स्टार खेळाडू मैदानात भिडले, अंपायरलामध्ये पडावं लागलं Video

कसा सुधारणार नेट रन रेट?

टीम इंडिया सुपर 8 मध्ये ग्रुप ए चा भाग आहे. यात आता टीम इंडियाचे दोन सामने हे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवले जातील. तेव्हा या दोन्ही सामन्यात 50 ते 70+ धावा किंवा 8 ते 10 विकेटने भारताला विजय मिळवावा लागेल. टीम इंडिया जर प्रथम गोलंदाजी करत असेल तर त्यांना विरोधी संघाला कमी स्कोअरवर थांबवावं लागेल, जसे 120 ते 140 धावांच्या खाली आणि विजयासाठी मिळालेल्या टार्गेटला सुद्धा लवकर कमी बॉलमध्ये पूर्ण करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन NRR सुधारू शकतो. जर भारताने उर्वरित सामन्यात प्रथम फलंदाजी केली तर त्यांना 200+ स्कोअर करावा लागेल आणि समोरच्या संघाला 150 धावांच्या खाली रोखावं लागेल. असं झाल्यास टीम इंडियाच्या नेट रन रेटला मोठा बूस्ट मिळेल आणि तो वाढू शकेल.

हेही वाचा : T20 World Cup 2026: पराभवानंतर ‘या’ योगायोगामुळे टीम इंडिया पुन्हा जिंकणार? जुळलेला ‘महासंयोग’ नक्की काय?

नशिबाची साथ सुद्धा गरजेची ठरणार :

टार्गेटचा पाठलाग करणं हे सहसा नेट रन रेट सुधारण्यासाठी अधिक फायदेशीर असतं, विशेषतः अशावेळी जेव्हा तुमच्या समोर तुलनेनं कमकुवत संघ असतो. अशावेळी टीम इंडियाला नशिबाची साथ सुद्धा लागणार असून जेणेकरून ते टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडतील. उदाहरणादाखल बोलायचं झाल्यास जर समोरच्या संघाने 120 धावा केल्या आणि भारताने तो स्कोअर 10 ओव्हरमध्ये चेज केला तर टीम इंडियाचा नेट रन रेट हा खूप वेगाने सुधारेल आणि ‘+’ मध्ये येईल. म्हणजेच आता टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात डोमिनेट करावं लागणार आहे. तेव्हा कुठे जाऊन टीम इंडिया साठी सेमी फायनलचं दार उघडेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

राजस्थानसह 7 राज्ये कोरडे; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंद

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपावसाचा इशारा : राजस्थानसह 7 राज्ये कोरडी; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंदभोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी करापूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!